मी स्तब्ध होतो क्षणभर
ऋतू बदलतो आपली कूस
प्रत्येक क्षण तुझी आराधना करतो
निसर्गाचा पट उलगडत जातो
तू सामोरी येतेस
अर्थगर्भ जाणिवा विसावतात
मनातील घालमेल संपते
आणि अचानकच आभाळ निरभ्र होते
तू तर काहीच बोलत नाहीस
पण तरीही बरेच काही बोलून जातेस
मी तुझ्या गूढ वागण्याचा अर्थ लावतो
पण हाती काहीच लागत नाही
जेव्हा तू बोलतेस तसे वाटत राहते
अजून खूप काही बोलायचे राहीलेच आहे
समाधान कशानेच वाटत नाही
तहान काही केल्या मिटत नाही
जेव्हा तू दुरावतेस तेव्हा असे वाटते
की तू सोबतच आहेस
पण तू माझी काळजी बिल्कुल करु नकोस
तुझी अनुपस्थिती आणि माझा एकटेपणा
यांची ओळख अगदी जुनी आहे...
No comments:
Post a Comment