वेबसाईट लिंक: https://dramitmedhekar.com His Book Name: The Dark Night is Over: Believe! Life is Sunshine! [Paperback, 2023] Link on Amazon: https://amzn.eu/d/8Gtt3AT परिचय: ते व्यवस्थापन शाखेचे संशोधन मार्गदर्शक आहेत. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही पदवी प्रदान केली आहे. मुळात ते अभियांत्रिकी पदवीधर बी.ई. (उत्पादन) आणि व्यवस्थापन प्राध्यापक- एमबीए (मार्केटिंग स्पेशलायझेशन) आहेत.
Friday, December 15, 2023
स्वतंत्रतेची किंमत
कोण जाणे...
बासरीचा सुरेल आवाज मी
साठवतो ह्र्दयाच्या गाभ्यात
आणि दूर क्षितीजावर
झिळमिळतो संधिप्रकाश
रात्र उमलते
चांदण्यांच्या फुलांची उधळण करते
आकाश उजळते
त्यांच्या किणकिणीने
सारी पृथ्वी लोप पावते
काळाचे गतिमान चक्र विसावते
मुसळधार पाऊस धुवून काढतो झाडं
जी डवरतात काळोखात मूकपणे
नदी दुथडी भरून
नागमोडी वळणांतून मार्गस्थ होते
नि पाणी जमिनीला सुपीक बनवते
पुढे पुढे जात राहते
या भिनलेल्या आसमंतात
मी ही अचानक लुप्त होतो
का कोण जाणे मग मला कसचीच
आठवण नाही बोचत
-अगदी तुझी सुद्धा
तुझा मार्ग
तुला माझ्यासोबत चलायचे आहे का?
अनेक रस्ते मोकळे असतात चालण्यापूर्वी
पण एकदा पाऊल पुढे टाकल्यावर
पुन्हा मागे फिरता येत नाही
सोबत करतात फक्त आठवणी
तुझ्या बरोबरचा कोणताही मार्ग
चालायची माझी तयारी आहे-
काटेरी असो किंवा राजमार्ग
माझ्या काहीही अटी नाहीत
या पूर्वीही माझे पाय रक्ताळून बरे झालेत
फुलांनाही कोमेजावं लागतं कधी न कधी
हे काय ठाऊक नाही तुला?
तसेच आपलेही श्वास थोडकेच ना?
आजचं मरण उद्यावर एवढेच
ते तरी सुसह्य करुया ना
प्रकाश अस्तित्वात आहे म्हणजेच
अंधाराचे न असणे होय
तसेच प्रेमाचे अस्तित्व असणे म्हणजेच
दुःखाचे न असणे होय
म्हणून आजच ठरव "तुझा मार्ग"
"माझ्यासकट" वा" माझ्याविना"
निर्मिती
काळ।।।
स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवा!!!
चला आपल्या जीवन-नौकेचे सुकाणू
आपल्या शक्तिशाली हातात घेऊया.
त्यांच्या असहकारासाठी इतरांना दोष देऊ नका.
स्वत:ची मर्यादा तोडून अमर्याद
आकाशात उंच भरारी घ्या.
जेव्हा तुम्ही विस्तारणारे निळे
आकाश बनणे निवडू शकता,
तेव्हा लहान अस्पष्ट ढग बनू नका.
जेव्हा तुम्ही तेजस्वी सूर्य बनू शकता,
तेव्हा सर्वव्यापी वाऱ्याची भीती बाळगू नका.
जेव्हा तुम्ही अद्भुत चंद्र बनू शकता,
तेव्हा तुरळकपणे चमकणारा तारा बनू नका.
जेव्हा तुम्ही विलक्षण पृथ्वी बनू शकता,
तेव्हा रखरखीत पठार बनू नका.
जेव्हा तुम्ही गर्जना करणारा समुद्र बनू शकता,
तेव्हा लहान लाटा बनू नका.
जेव्हा तुम्ही एक अमर्याद विश्व बनू शकता,
तेव्हा एक लहान सूक्ष्म जग बनू नका.
जेव्हा तुम्ही दयाळू होऊ शकता,
तेव्हा स्वकेंद्रित अहंकारी होऊ नका.
हे सर्व जाणीवपूर्वक निवड, ठोस निर्णय
आणि सर्वोत्तम अंमलबजावणीबद्दल आहे.
जेव्हा तुम्ही स्वत: तयार केलेला उंबरठा
एकदा ओलांडू शकता,
तेव्हा तुम्ही जुन्या मनाच्या तावडीतून
कधीही स्वतःला बाहेर काढायला शिकू शकता.
मन स्वतःच्या मर्यादा निर्माण करते,
सजगतेने ते स्वतःच्या मर्यादा मोडू शकते.
स्वतःवर विश्वास ठेवा.
व्यापक ज्ञान घेऊन स्वतःमध्ये
संपूर्ण परिवर्तन घडवून आणूया.
विचारांनी स्वतः तयार केलेल्या
अरुंद चौकटींच्या पलीकडे जा.
वर्तमानात असण्याचा अमर्याद आनंद घ्या.
एकदा स्वातंत्र्याची चव चाखा!
मग आपण ते नेहमी पुन्हा चाखू शकता.
तुमची भव्य स्वप्ने निवडा आणि त्यांचा पाठलाग करा.
स्वातंत्र्याला आलिंगन देण्यासाठी
फक्त आपले मनाचे विशाल पंख पसरवा.
वाटेत केवळ प्रमुख टप्पेच नव्हे
तर प्रवासाचा आनंद घेऊया.
जीवन बहुआयामी आहे आणि प्रत्येकासाठी
एक मोठा वाटा ठेवला आहे.
संकुचिततेच्या पलीकडे जा!!!
दुसऱ्यांना मदत करा!!!
आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास ठेवा !!!
स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवा-
इथे आणि आत्ता!!!
अंतरतमातील अवकाश
अरेरे! आजूबाजूला किती विराट अराजकता आहे!!!
तरीही प्रत्येक सुंदर मनाला प्रगाढ शांततेचीच ओढ आहे.
शारिरीक संवेदनांचा आधार घेत अनित्यता जाणणे
म्हणजेच स्वतःत समूळ परिवर्तन करणे .
आपण ती प्रत्येक कृती विचारपूर्वक निवडावी
जी आपल्या हृदयाला नितांत शांत करते.
जेव्हा आपण अविचाराने घेरले जातो,
तेव्हा आपल्या विश्वासाच्या विलक्षण दृढ अशा आंतरिक
आवाजातून अधिक निरवता र्निर्मित होऊ द्यावी.
मी मानवतेच्या दुःखमुक्ततेचे अस्तित्व साजरे करतो.
त्याने माझ्या अंतरतमात अमर्याद प्रेम उचंबळत राहते.
मला क्षणभरात आजूबाजूचे स्वार्थी जग
आणि त्याच्या तीव्र वेदना यांचा विसर पडतो.
नि मी वर्तमान क्षणात स्वत:ला सृजनतेत झोकून देतो.
सर्वांसाठी प्रत्येक क्षणी शरीराचा नाश सुरू झाला आहे.
हे क्षणभंगूर शरीर म्हणजे प्रत्येकाला
भाड्याने मिळालेले मर्यादित अस्तित्व आहे.
म्हणून कोणाशीही वा कशासाठीही असणारी आपली
आसक्ती अगदीच व्यर्थ आहे.
प्रीतीने ओथंबलेल्या सरलतेने आपल्या
जुन्या क्लिष्ट स्वार्थी सवयींपासून मोकळे होऊ या.
आपण शरीर, मन आणि काळाचे गुलाम आहोत.
ते अडथळे ओलांडण्याचे धाडस करूयात.
उदयव्ययातून आलेली सखोल समजेची
झलक आधी क्षणभर येऊ शकते.
नंतर सतत जागरूकतेने आणि मनाच्या
समतेने ती दिर्घकाळ टिकते.
चला दयाळू आणि निःस्वार्थी होऊया.
मग आपण पलिकडच्या किनाऱ्यावर नक्कीच पोहोचू .
नि मग आपण तुलना आणि द्वैतात अडकणार नाहीत.
तेव्हाच ‘अ-मना’ मध्ये - अद्भुत तेजस्वी कमळ फुलेल.
पीसी: Google images आणि फेसबुक
कॉपीराइट ©2023, डॉ. अमित मेढेकर. सर्व हक्क राखीव.
तुझ्यामुळेच
रुजतंच नसतं मनांत काही
तू गातेस जीवनगीत
तेही ऱ्हदया पर्यंत पोचत नाही
तू हाक देतेस मोठ्याने
ती ही हवेतच विरून जाते
रुजतंच नसतं मनांत काही
तू खूप बोलत राहतेस
तेव्हा निशःब्द व्हायला होतं
तू खळाळून हसतेस
मी मौनच राहतो
रुजतंच नसतं मनांत काही
तू प्रेम उधळत जातेस
स्वतःसाठी काहीच मागत नाहीस
परतफेड म्हणून- प्रेम सुद्धा
त्या माझ्या कोरडेपणावर मनातल्या
मनातच मीच कोरडे ओढतो
रुजतंच नसतं मनांत काही
तू म्हणजे जीवन चैतन्य असतेस
जणू खळाळता झरा
तू निरागसपणे पसरत जातेस
तुझ्या मनातील चंद्रप्रकाश
जेव्हा मी विझत जातो अंधाराप्रमाणे
रुजतंच नसतं मनांत काही
कारण जेव्हा तू शोधतेस
सर्जनशीलता म्हणजेच ओतप्रोत जीवन
तुला जाणवतो जीवनप्रकाश
मला जाणवते मृत्यूची गडद छाया
कदचित अनेक युगांनंतर
अचानकच रुजू पहातं मनांत काही तुझ्यामुळेच
तेव्हा क्षणार्धात प्रेमसत्य बीज रुजतं
माझ्या ह्रदयात जीवनानंद नि मृत्यूदंशा पलिकडलं
नि तेव्हापासून मी चालतो अखंडपणे
काल तीरा पलिकडे
नि सुरू रहातो जीवन-मृत्यू पलिकडील मुक्त-प्रवास
सत्य सूर्याच्या प्रकाशात तुझ्यामुळेच !!!
विस्तारणाऱ्या प्रकाशगंगा
सहज स्वतःच्या कक्षा रुंदावत जातात
जेव्हा उडताना लागत नाही आकाशाचा थांग
तरीही संपत नाही अधीर आस
रिते न होणाऱ्या अनंताला कवेत घेण्याची
पक्ष्याला जेव्हा आधी नाही जाणवत स्वतःच्या
पंखांमधले असीम बळ नवी उंची गाठतानाचे
नि अचानक होते जेव्हा प्रथमच ओळख स्वक्षमतांची
नकळत अफाट विश्व बनते
एक छोटेसे सीमित अस्तित्व
सप्तरंग मनोकाशात विखुरतात दिमाखात
तेव्हा ज्ञानआयामांचे अनेक रंग देतात प्रकाशबोध!
रंगीबेरंगी धाटणीने मनःपटल उजळवत
स्वतःच्याच नानाविध कंगोऱ्यांना सहजी स्विकारणारे!
कुठूनसा काळा ढग आकाशातून मार्गस्थ व्हावा
आणि त्याच्या मागे दडलेला विराट सूर्य मुक्त व्हावा
तशीच होते माझी सुटका क्षणार्धात लौकिकातून
आणि अव्यक्तातात प्रकाशमान होतो माझा गूढ अंतरंग
चमकून जावा वीजेगत लकाकणारा लख्ख विचार
तसे शीघ्र जागृत होतात इंद्रिय स्वबोधाने
त्यातच मी होतो मौन नि स्थीर या प्रगाढ गतीत
विस्तारणाऱ्या प्रकाशगंगा हदयात साठवत!
तुला माहित नसेल हे...
मी मनाचे कप्पे
बंद करुन ठेवले आहेत
त्यातील अवकाश फक्त
तुझ्याच आठवणींनी व्यापला आहे
तुला माहित नसेल हे
प्रत्येक येणारा श्वास
शरीरभर पसरतो तेव्हा
तो तुझेच गाणे गात असतो
तुला माहित नसेल हे
तुझ्याच विचारात रमत असताना
लवणारी पापणी सुद्धा
सतत तुझेच चिंतन करते
तुला माहित नसेल हे
माझ्या शरीरावरील प्रत्येक पेशी
तुला बघताच झंकारुन उठते
नि डोळ्यातून सूर्यकिरणे पाझरू लागतात
त्यानेच संपूर्ण विश्व प्रकाशमान होते
तुला माहित नसेल हे
तुझे नसणे जेव्हा अश्रूंचा
पूर होवून समुद्र बनते
तेव्हा किना~यावर आदळणाऱ्या लाटा
सतत तुझेच नामस्मरण करतात
तुला माहित नसेल हे
जेव्हा तु खळाळून हसतेस
नि माझे कान तो नाद प्राशन करतात
तेव्हा पक्षांचा कोलाहल सर्वदूर पसरतो
आणि झाडांची सळसळ आसमंतात विरते
हे सारे मी अनुभवतो तर्कापलिकडले
पण तुला माहित नसेल हे...
प्रिय आई!!!
सर्वत्र एकदम प्रगाढ शांतता आहे.
मी एकामागून एक क्षण निवडतो.
नी काळ-मोत्यांचा एक अप्रतिम
चमकणारा हार बनवतो.
हा काळाचा तेजस्वी आणि चमकदार
अलंकार मी तुझ्या गळ्याभोवती घालतो, आई!
मी तुझ्या मंगल चरणी मस्तक ठेवतो.
तुझ्या सर्व प्रेम, भावना आणि आपुलकीच्या
महापूरांनी माझे आनंदाचे अश्रू
माझ्या गालावर हळू हळू ओघळतात.
तुझे अगणित आशीर्वादच जणू
माझी अगाध श्रीमंती आहेत.
तू पावित्र्याचे मूर्त स्वरूप आहेस.
तुझ्या अंतःकरणातील तुझी असीम
शांतता हाच माझा खजिना आहे.
काय आश्चर्य आहे! तो माझे हृदयही उजळवतो.
नि त्याचे धडधडणारे ठोके सर्वत्र वैभव पसरवते.
मी तुझ्या औदार्याने तुझ्या मनाच्या
सौंदर्याची चमक पाहतो.
माझे हृदय तुझ्या सूर्यप्रकाशाने ओथंबून जाते.
आई! तुझ्या सौम्यतेची नि सौहार्दाची मी पूजा करतो.
माझ्या अपूर्णतेवर तू तुझ्या
अनंत प्रेमाचा वर्षाव करतेस.
मी तुझ्या अथांग सह्यदयतेची आराधना करतो
नि तुझ्या सामर्थ्याची आणि निःस्वार्थतेची प्रशंसा करतो.
प्रिय आई, तुझ्या पवित्रतेचे अमर्याद
अमृत मी प्राशन करतो.
तेच मला माझ्या हृदयकेंद्रात
प्रसन्न नि समाधानी करते.
शोध
मोजता येतात तारखा
पण थांबवता येत नाही
काळाचा उसळता प्रवाह
शोधता येतात चेहरे आपल्यांचे गर्दीत
पण कळत नाही कधीच
आपल्यांचे आपले न होता गर्दीत मिसळणे
सागरात ओंडके एकत्र येतात
नि काही काळानंतर कायमचे विलग होतात
तसेच आपलेही एकत्र येणे आणि दुरावणे असेल कदाचित
किती तो खटाटोप आपले काही असण्या
अथवा काही नसण्या बद्दलचा
हे विसरुन की आहेत मोजकेच श्वास प्रत्येकाला
उरी आपापली सुख-दुःखं बाळगत
जगरहाटी थांबत नाही कोणासाठीच
तीळ तीळ जीव तुटत राह्तो आपला
श्वास-उश्वासाची साखळी विस्तारत जाते
आणि बंदिस्त शरीरात आपण आपल्या
आठवणी घोळवत राहतो अनाहूतपणे सतत एकटेच
आयुष्याचा थांग लागणे अवघड....
जशी वा~याची मंद झुळूक
मुठीत पकडण्याचा प्रयत्न करावा
आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटावी
अथवा प्रेमाच्या अनंत आयामांना
आपल्या बुद्धिच्या चौकटीत
बंदिस्त करण्याची गुस्ताखी करावी
नि हे सगळं जाणतो मी म्हणत
क्षणोक्षणी पुन्हा पुन्हा सतत
तुला विसरण्याचा प्रयत्न करावा
आणि आपसूकच शोध चालू करावा
स्वतःचाच नव्याने
तुझ्या आठवणींच्या प्रकाशात...
वस्त्रे
ओळख
मी स्तब्ध होतो क्षणभर
ऋतू बदलतो आपली कूस
प्रत्येक क्षण तुझी आराधना करतो
निसर्गाचा पट उलगडत जातो
तू सामोरी येतेस
अर्थगर्भ जाणिवा विसावतात
मनातील घालमेल संपते
आणि अचानकच आभाळ निरभ्र होते
तू तर काहीच बोलत नाहीस
पण तरीही बरेच काही बोलून जातेस
मी तुझ्या गूढ वागण्याचा अर्थ लावतो
पण हाती काहीच लागत नाही
जेव्हा तू बोलतेस तसे वाटत राहते
अजून खूप काही बोलायचे राहीलेच आहे
समाधान कशानेच वाटत नाही
तहान काही केल्या मिटत नाही
जेव्हा तू दुरावतेस तेव्हा असे वाटते
की तू सोबतच आहेस
पण तू माझी काळजी बिल्कुल करु नकोस
तुझी अनुपस्थिती आणि माझा एकटेपणा
यांची ओळख अगदी जुनी आहे...
आई
तरी माणसं शिल्लक राहतात!!!
माणसं शिल्लक राहतात -
मनामनांत, मुक्त विचारात, लेखकांच्या पुस्तकांत
आणि निर्व्याज ह्रदयात।
माणसं शिल्लक राहतात -
फुलांच्या सुगंधात, पाऊस सरींच्या कोसळण्यात,
वा-याच्या मंद झुळूकांमधून, चंद्राच्या शीतलतेत,
सूर्याच्या सहस्र रश्मींमध्ये, तारुण्याच्या ऊर्जेमध्ये,
जगण्याच्या जिद्दीमध्ये।
माणसं शिल्लक राहतात -
कधी फुलाच्या कोमेजण्यात, पिकल्या पानाच्या गळण्यात,
शेतातील कोरडया ढेकळांमधे, वादळाच्या दिशाहिनतेत,
अमावस्येच्या अंधःकारात, सूर्यास्ताच्या व्याकूळतेत।।।
तरी माणसं शिल्लक राहतात -
आपल्या डोळ्यांतील चमकेमध्ये।।।
शेवटपर्यंत।।।
जीवन!!!
किती दिवस सरले वा अजून किती उरले
याचा लेखाजोखा काेणास ठाऊक?
कितीदा आपण आपल्या पायांवर उभे ठाकलो।।।
कित्येकदा पडलो, धडपडलो आणि सावरलो।।।
बरेचदा ठेचकाळलो, बिचकलो आणि तरीही मार्गस्थ झालो।।।
कितीदा स्थीर झालो, कधी कधी भरकटलोच।।।
आपल्या क्षमतेप्रमाणे आपणही विस्तारलो।।।
आपलीच पाळंमुळं जास्तीत जास्त खोलवर रुजवली।।।
कधी आपल्याच हिमतीवर जग जिंकून घेतले।।।
तर कधी आलेले अपयश निमूटपणे स्विकारले।।।
स्वार्थी आणि क्रूर माणसे काळाच्या ओघात नाहिशी झाली।।।
प्रेमळ आणि निरलस माणसं ह्रद्य आठवणी पेरून गेली।।।
कधी पुराने वेढावे तसे चहूबाजूंनी दुःखाने घेरले।।।
संकटं आली आणि शहाणंसुरतं करून निघून गेली।।।
आपणच आपला बोथटपणा स्विकारला।।।
कधी आपल्याच भावनांचा पोरखेळ केला।।।
बरेचदा इतरांची उणीदुणी काढत राहिलो।।।
इतरांच्या उखळ्या-पाखळया काढत राहिलो।।।
तरीही काहींना भरभरून दिले।।।
काहींना मदतीचा हात दिला।।।
कधी दु:खाच्या खोल गर्तेतून कसेबसे बाहेर पडलो।।।
आणि आपणच आपल्या जीवनाचा दुस्तर घाट पार केला।।।
तरी अनपेक्षितपणे काही सोबती मिळाले, काही विखुरले।।।
काही निरपेक्ष नाती जुळली, काहीची गुंतागुंत कधीही सुटली
नाही।।।
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मागोवा घेत पुढे जात
राहिलो।।।
तरीही काही इच्छा अपूर्णच राहिल्या कालौघात।।।
तरीही कधी मिळालेच भरभरून जीवनाच्या शिदोरी प्रमाणे
पुरणारे।।।
आपणही वाटचाल करत राहिलो तक्रार न करता।।।
पण कधी कळलेच नाही जीवनाचा शेवट कधी येवून ठेपला।।।
मी चाचपडतोच आहे कुठे गेला अनपेक्षितपणे
वेगाने निसटून गेलेला काळाचा
छोटासा तुकडा ज्याचे नाव आहे-जीवन।।।
मुक्तता।।।
वळणा वळणावर मागोवा घेत
आपण पुढे पुढे चालत राहतो।।।
कधी आपला मार्ग क्लिष्ट तर
कधी राजमार्ग असतो।।।
जेव्हा आपण सोडतो उसासे
तेव्हा ह्रदयावर कोरला जातो इतिहास।।।
भूतकाळाची ओझी निमूटपणे
ओढताना आपली खूपच फरफट होते।।।
तेव्हा आपल्याला जाणवते
आपल्या अंतरतमातली तीव्र वेदना।।।
नि पोकळ सांत्वनाचे बुडबुडे
कधीच भरू शकत नाही खोल जखमा।।।
रुतलेली वाक्यं मनाला चिरत
अंतरात घर करून राहतात।।।
नि आयुष्यभर वाहिलेल्या चिंता हळूहळू
कपाळावर आठ्या निर्मित करतात।।।
दुःख आपल्या पाचवीला पुजलेले असते।।।
अस्वस्थता विस्तारत जाते।।।
बहराच्या दिवसांतल्या आठवणी डाचू लागतात।।।
संपत चाललेलं प्रत्येकाचं आयुष्य जगण्यावर
प्रश्नचिन्ह निर्माण करते।।।
विविध प्रकारच्या असतात व्यक्त अथवा अव्यक्त व्यथा।।।
काही प्रकटतात आवेगाने तर काही राहतात सुप्त।।।
तरी भावनांना मोकळी वाट हवी असते।।।
आणि बंदिस्त विचारांना हवी असते मुक्तता
शरीराच्या मीपणाच्या पिंजऱ्यातून कायमची ।।।
दिवाळी म्हणजे...
दिवाळी म्हणजे पणत्या दारी लावता लावता
आपले -हृदय ओतप्राेत प्रेम-प्रकाशाने उजळवणारा उत्सव।।।
दिवाळी म्हणजे आनंद नि समाधान, वात्सल्य नि प्रेम,
परंपरा नि नावीन्य यांचा मिलाफ साधणारा सण।।।
दिवाळी म्हणजे प्रकाश उधाणणारा आणि आपुलकी
जपण्यासाठी भरघोस संधी देणारा विरळ-क्षण।।।
दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटता भेटता मनाचा
प्रत्येक कानाकोपरा प्रफुल्लित करत पुन्हा पुन्हा आठवणी
जोपासण्यासाठीचे निमित्त।।।
दिवाळी म्हणजे फटाके उडवताना, फराळाची मेजवानी
अनुभवताना लहानथाेरांनी नात्यांना दिलेला अर्थ।।।
दिवाळी म्हणजे वसुबारसेचे वात्सल्य, धनत्रयोदशीची
अर्थपूर्णता नि मांगल्य, नरकचतुर्दशीची शुचिर्भूतता ,
लक्ष्मी पूजनाची संपन्नता, पाडव्याची प्रसन्नता नि भाऊ
बीजेची प्रेमळ उन्नतता।।।
दिवाळी म्हणजे जीवनाची सर्वोत्तम सृजनशीलता नि
आयुष्याच्या नवनिर्मितीच्या चढत्या आलेखाचा शुभारंभ।।।
दिवाळी म्हणजे जिव्हाळा, सौहार्द आणि
भव्यतेचे आगळे वेगळे प्रकटीकरण।।।
दिवाळी म्हणजे आपणच जोखलेले
नि आपणच निर्मिलेले आपलेच
लखलखणारे तेजःपुंज अस्तित्व।।।
आकाशातला बाप
माझ्या बापा-
आकाशातून प्रकाशकिरण
तुझ्या चेह-यावर पडल्यावर;
ठळकपणे प्रथमच दिसल्या
तुझ्या कपाळात रूतलेल्या आठयांच्या रेघा.
आताशा वाटतात तुझे डोळे थकल्यागत;
जाणवतो वेग मंदावताना पाऊलं टाकताना;
तुझ्या चेहऱ्यावरील घामाच्या र॓षा
खूप काही बोलून जातात.
सोसतच राहिलास तुझं दुःख निमूटपणे एकटाच;
पण वेदनेला मात्र कधीही प्रकट केलं नाहीच कुठेच;
तू अथक प्रयत्नातून जपलंस आम्हाला
पण प्रदर्शन नाही केलंस तुझ्या उपकारांचं.
अदीम मानवी जडणघडणीतून उत्क्रांत
झालेलं अजब रसायन आहेस तू;
नेहमीच तू पचवलंस कठोरपणे अनेक युगांचं
कष्टदायक कौटुंबिक कर्तेपण.
तू गर्जून भेदलंस आकाश कधी
तर कधी जपलंस आकाशाचं अतक्यॆ अमर्यादपण;
तळपलास कधी तळपत्या तलवारीगत तर
कधी बनलास अभेद्य ढाल संकटात.
आमच्या गरजा भागवताना दिलंस भरभरून सारंच;
पण तू मात्र रिताच राहिलास आभाळागत;
मागे वळून पाहिलं नाहीस कधीच
नाही जमला तुला व्यवहार्य अचूक शहाणपणा.
चुकलेही असतील तुझे आयुष्याचे अडाखे;
कित्येकदा हरलाही असशील जगरहाटीनुसार;
पण जरी सारं जग फितुर झालं
तरी तू विखुरलं तुझं बापपण प्रत्येकासाठी.
तेव्हा थोडंसं आकाशही थरारलं असेल;
आणि आकाशातला बापही बरसला असेल-
आकाश कोनाड्यात एकटाच
- एक बाप म्हणून...
अंतरतमातील अवकाश।।।
किती काळ पोटापाण्यासाठीच्या खटाटोपीचा।।।
आपण जगण्याची ऊर्मीच हरवून बसतो।।।
श्वास घेण्यासाठी फुरसत नाही।।।
आपल्यांसाठी द्यायला वेळ नाही।।।
मनात वादळं चालू राहतात।।।
छोट्या जीवनात अतोनात कष्ट करायची क्षमता
विकसित करावीच लागते।।।
पैसा कि समाधान याची समांतर भूमिका समजून घ्यावी लागते।।।
रक्ताची नाती कि मैत्री यांचा
लेखा जोखा करणे कठीण जाते।।।
स्वार्थकेंद्रीत जगत राहण्याचा फोलपणा आपल्याला
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही बरेचदा।।।
जुन्या रूसव्या फुगव्याच्या जाडजूड भिंती
नात्यात उभारून आपण नकारात्मकतेच्या
चौकटीत बंदिस्त करतो स्वतः ला।।।
कधीही आपणांस असमाधानाची
कक्षा आेलांडता येत नाही।।।
पार नाही करू शकत आपण
रागाच्या परिसीमा कायमस्वरूपी।।।
होत नाही आपल्या कडून कोतेपणाचा बीमोड।।।
नाही करता येत एक घाव दोन तुकडे आपल्या अहंकाराचे।।।
बुद्धी मधील जाळे जळमटं साफ
करण्याची हिंमत आपण नाही करत कधीही।।।
स्वतः मधले दोष नाहीच उमजत कधीच
आपले आपल्यालाच - नकळत जगाकडे बोट दाखवताना।।।
जसा कांद्याच्या परती मागून परत
उतरवताना गाभ्याशी राहतोच केवळ अवकाश।।।
तसेच बहरु शकते अनंतात
प्रकटणारे शुन्यत्व ह्रदयाच्या केंद्रात।।।
नी जाणवतो तोच होता आपला बहर।।।
ज्याला प्रगट करण्या ऐवजी आपण
कोंडून ठेवला 'मी' पणात अनपेक्षितपणे।।।
आणि जेव्हा आत्मकेंद्रित असण्याचा
अभिशाप आपण पुसतो प्रथमच।।।
तेव्हा आपण मुक्तीकडे वाटचाल करू लागतो।।।
आपणाला अचानक सापडतो आपल्यातल्याच
अंतरतमातील अवकाश ।।।
स्वपणा पलिकडला- परिपूर्ण नि स्वतंत्र –
कदाचित अंतिमतेपूर्वी का होईना।।।
प्रवास।।।
पाय थबकतात वळणावर अनाहूत पणे।।।
वाटेवर चालता चालता थकवाही मुरतो पावलांमध्ये।।।
आठवांना साद घालतात वेदना क्षणोक्षणी।।।
डोळ्यातील पाऊस कधीचा ओसरलाय।।।
कोरड्या हवामानात बदल करण्याची किमया
केवळ पावसाच्याच अखत्यारीत असते।।।
तुम्हीच ओथंबणारा पाऊस बनून माझ्या
काेरडया -हृदयाचा कायापालट करतात।।।
धुवांधार सरी सतत कोसळताना
जाणवत राहतो मृद्गंध ।।।
शरीराच्या प्रत्येक पेशीपेशीला
ताजातवाना करणारा।।।
तुम्हीच श्वासोश्वास बनून
उजळवता माझे अधुरे अस्तित्व।।।
बनता माझ्या जगण्याच्या उद्देशाची आस आणि
आंतरिक आशा यांचे उन्नत मिश्रण।।।
अनंत स्रोतांचा ओघ वेगाने
लपेटतो मला अचानकच।।।
माझे असणे उरतच नाही,
उरता तुम्हीच तुम्ही सर्वत्र।।।
जणू आकाशात अरुणोदय होतो।।।
एक ज्ञानकिरण पुरेसा असतो
अंतःकरणातील अंधःकार संपवण्यासाठी ।।।
अचानकच मी रहात नाही कुठेही ।
नि स्वत्व गळून पडते निमिषार्धात।।।
तुम्हीही रहात नाहीत कुठेच।।।
काहीही रहात नाही।।।
न तुम्ही, न मी, न इच्छा, ना आकांक्षा,
ना अपेक्षा, ना अहंकार सुद्धा।।।
सर्वत्र उपलब्ध होते वैश्विक शुन्यत्व सहजतेने।।।
तरी रूढ अर्थाने सुरू राहतो
आपला प्रवास अथकपणे।।।
एका आकाश गंगेकडून
दुसऱ्या आकाश गंगेकडे ।।।
मैत्री म्हणजे ....
नवनिर्मिती सहजी साध्य होत नसतेच मुळी
साक्षीत्व
अंतिमतेची प्रतिक्षा
असे क्वचितच घडते
आपण जेव्हा जाणतो जगण्याचे रहस्य
उलगडत जातात आयुष्यातील घटनांचे संदर्भपट।।।
अनेक वळणांचा प्रवास सुरूच राहतो
नानाविध आकांक्षांचे प्रकटीकरण करत नव्यानेच।।।
आपल्याच मनकंगोऱ्यांचा सतत मागोवा घेत
सुरूच राहतो जीवन ध्येयासाठीचा निरंतर ध्यास।।।
पडतातच ओंजळीत काही उजळणारे क्षण-मोती अवचित पणे।।।
तेच असतात प्रकाश-बोध मनाचा आसमंत उल्हासित करणारे।।।
अनपेक्षितपणे आपल्या मनोकाशात
सुरूच राहतो जीवनघटनांच्या ऊन-पाऊसाचा लपंडाव।।।
हृदयात वाहत राहतो उसळणारा सात्त्विक-प्रकाश प्रवाह।।।
शुद्ध-गंगेच्या तेजस्वी तुडुंब पात्रागत विस्तारलेला स्वयंभू।।।
कदाचित आपणही न्हाऊन निघतो अंतर्बाह्य
त्या ऊर्जा स्त्रोतात अनाहूतपणे।।।
जाणवत राहतो आपल्याला आपलाच विराट नि भव्य विस्तार।।।
आपले खुजेपण नाहीसे होते सहजपणे।।।
नि आपण कवटाळतो क्षितिजापलिकडचा
आपलाच अतर्क्य स्वनिर्माण।।।
त्यातून जाणवतो मनातील सहस्त्रसूर्याचा
बेफाम नि वेगवान भासणारा तरी दैदिप्यमान उद्गम।।।
आणि प्रकटते आपलेच निश्चल, निडर नि निष्कलंक
अस्तित्व।।।
आपणही स्वतःच स्तिमित होतो स्वतः च्या
निरपेक्ष नि निरलस जीवनप्रभेने।।।
निर्मित होते अवैयक्तिक,अनपेक्षित नि दुर्मिळ पूर्णत्व,
असे क्वचितच घडते मानव इतिहासात।।।
वाटचाल।।।
वाटतं आपण सुद्धा आपल्या आयुष्याचा
सांगोपांग विचार करायलाच हवा।।।
झुकण्याची कला आपणही आत्मसात करावी।।।
पण दुबळे वाटता कामा नये हेच खरे।।।
कधी आपणही चुकतोच की आणि
आपण हे मान्य करण्यात काही वावगे नसते।।।
पण आपण नेहमीच चूक असतो
हे ही नसते खरे हे आपले आपणच जोखावे कधीतरी।।।
आपणात नम्रता आणि ऋजुता असावी ।।।
पण आत्मकेंद्रीपणा आणि आढ्यताखोरपणा नसावा।।।
तरी आपण नाही तयार होत मान्य करायला।।।
की स्वकेंद्रित बुद्धी पेक्षाही साधेपणा श्रेयस्कर।।।
जीवन म्हणजे काही गंमत नव्हे।।।
जन्मभर प्रेमाच्या शेकडो शपथा घ्यायच्या
आणि बरेच पुढे आल्यावर
साथ सोडण्याच्या गोष्टी करायच्या।।।
कधी मागे वळून पाहताना
आयुष्यातील असंख्य पराभव नि
न भरून निघणाऱ्या वेदनादायक
जखमा प्रकर्षाने आठवतीलही।।।
तेव्हाच कस लागतो आपल्या या
तथाकथित नात्यांच्या पक्केपणाचा।।।
आपणास हताश करेलच भविष्यात मांडून ठेवलेले
हळूहळू अनाहूतपणे येणारे भितीदायक एकलेपण।।।
विशिष्ट काळ चालत बरेच पुढे आल्यावर
फसव्या शरीराच्या अनंत पणाची भ्रामक समजूत
गळून पडली की जाणवत राहतील आपल्याला
आपल्यासाठी इतरांनी केलेला असीम त्याग ते नसताना।।।
आठवेल त्यांनी मूकपणे आपल्यासाठी साहिलेल्या
ह्रदयावर गोंदवलेल्या वेदनांच्या नोंदी।।।
मग आठवतील कदाचित आपणच स्वतः त्यांच्या
मनावर केलेले अगणित क्रुद्ध प्रहार।।।
एवढे सहन करूनही त्यांनी न उच्चारलेला ब्र
बनवत जाईल आपल्याला प्रगल्भ नि अंतर्मुख।।।
पण न जाणो तेव्हा फार उशीर झालेला असू शकतो
आपला पश्चातापाचा टाहो त्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी।।।
कारण अनंताच्या प्रवासाची प्रत्येकाची वाटचाल सुरू
झालीये।।।
प्रत्येकाचा सूर्य निराळा असतो
पंखात किती बळ आहे हे जोखायला
भरारी घेणे आवश्यक असते.
आकाशाच्या निळाईमध्ये समरस व्हायला
उभारी घेणे गरजेचे असते.
आपण किती उंचीवर झेपावयाचे हे आपल्या पंखाच्या नि
मनाच्या खंबीरपणावर ठरते.
तरीही आपणच शोधायला हवा आपला मनोविस्तार आकाश
गंगेला कवेत घेणारा.
इतरांना दोष देत बसण्यात जन्म घालवण्याऐवजी
स्वत:मध्ये अमुलाग्र बदल करणे श्रेयस्कर.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते तेव्हा
आतला आवाज ऐकून नीट वागणे हेच शहाणपण.
आपण आपल्या आयुष्याचा मागोवा घेत
चुकत शिकत घट्ट पाय रोवायचे असतात.
जे मिळाले ते आपले- बाकी गंगेच्या प्रवाहात.
मिळालेल्या अनुभवाची शिदोरी हीच खूणगाठ.
चुकतात रस्ते, बदलतात वाटा, काटे पायात रूततात, दिशा
भरकटतात.
लांबच लांब प्रतिक्षा करत वेचलेले जीवनाचे महत्त्वाचे क्षण
निसटून जातात हातून पा-यासारखे.
वर्तमान काळात थांबत नाही काळ जास्त
कोणासाठीच निमिषार्धापेक्षा.
भविष्यकाळाचे भूतकाळात बेमालूमपणे मिसळणे
अव्याहतपणे चालूच राहते.
असामान्य असते प्रतिभा प्रत्येकाची.
तशीच प्रत्येकाची असते टोकाची आसक्ती जीवनाप्रती.
अनेक सत्गुण उजळवतात आपले अस्तित्व.
-आपले अस्तित्व असेपर्यंत नि नंतरही।।।
विस्तारतात क्षितिजं प्रत्येकाच्या आकाशातील.
सूर्य जाणवतो-कधी उगवणारा, तप्त, दैदिप्यमान
अथवा कधी मावळता, सौम्य नि उतरणीला लागलेला.
तरीही -आपापल्या मिळालेल्या स्वआकाशात-
प्रत्येकाचा सूर्य निराळा असतो-
बुडाल्यावर पुन्हा नव्याने उगवणारा-
प्रत्येकासाठी अंतिमतेपूर्वी-श्वास असेपर्यंत।।।
Thursday, December 14, 2023
अंतिम टप्पा
अवचितपणे अंधारातून प्रकाशाकडे
अव्याहतपणे पाऊलं टाकताना
कधी आपण प्रकाशमय सहस्रसूर्याच्या
दालनात दाखल होतो आपणच जोखू शकत नाहीत।।।
सदगुण जोपासताना अनपेक्षितपणे आपण
जीवनाच्या सकारात्मक पैलूंकडे
आपोआप खेचले जातो।।।
तीच बनते आपली स्वत:च्या
निर्माण कार्याची पायाभरणी।।।
अडचणी नि आव्हाने
क्षुल्लक भासू लागतात।।।
आकर्षणे नि प्रलोभने
क्षीण होत जातात।।।
विविध प्रकारच्या घटना जीवनाची वीण
अधिकाधिक प्रगल्भ बनवतात।।।
धडपडत पुन्हा एकदा नव्याने आपण निर्मितो
आपले ध्येयवादी कृतीशील अस्तित्व।।।
सहजी सुटावे कोडे असे नसते आयुष्याचे प्रमेय।।।
क्षणभरात पडतात फासे कधी अनपेक्षित
तर कधी हवे त्याहून उत्तम।।।
कळत नाही रस्त्यांचा लांबच लांब विस्तार।।।
तरीही बदलाला सामोरे जात आपण गाठतो अत्युच्च ध्येय ।।।
कारण मूल्यांची योग्य दिशा नेवून ठेवते अचूकपणे इप्सित
ठिकाणच्या अंतिम गंतव्यापर्यंत।।।
जाणवतात विविध शक्यतांचे प्रक्षेप नि लुप्त होतात
उपाध्यांच्या सावल्या।।।
मात्र खुणावतो पैलतीर तेव्हा सारे जग लोप पावते।।।
मग आपण ही मार्गस्थ होतो वेदनेचा अंतिम टप्पा
ओलांडत कायमचे।।।
अपार आनंद!!!
सगळीकडे भारलेला अपार आनंद
न थांबवता येईल असा
त्यातच उत्कटतेनं तुटलेल्या चौकटी
प्रगाढ निरवतेत सामावणा~या
मी उन्मुक्तपणे विहरतो
विचारांच्या विश्वापलिकडे
प्रकटतात अचानकच काही मुक्त ओळी
कवितांच्या माझ्या ओठांवर
मी शोधतो ओळींच्या
रुढ अर्थापलिकडला अर्थ
नाकारतो नियमांच्या कुबड्या,
नि प्रेमापलिकडल्या स्वयंपूर्ण रिक्तपणात
स्वत:ला झोकुन देतो
व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
निर्गुणतेतले पैलू आकर्षतात मला
सर्व जाणल्या जावू शकणाऱ्या गोष्टी
बंधनाला कारणीभूत ठरतात हे जाणतो मी
नि सत्याची प्रकाशवाट चोखळतो
मला माहित आहे
येथे काहीच कोणासाठी थांबत नाही
मागे काही उरत नाही
तरीही कवितेची अस्फुट अर्धवट ओळ
अचानक ओठांवर रेंगाळते
आणि जाणवतो सगळीकडे
भारलेला अपार आनंद
न थांबवता येईल असा
कार्य सुगंध!!!
आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता
आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।।
बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन, तारूण्य,
वार्धक्य असा प्रत्येकाचा प्रवास चालू राहतो।।।
काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे
नि निसटले क्षण हुरहुर लावून जातात।।।
अस्थिरता आणि गती जणू सर्वांना आपल्या
गर्तेत खेचत अस्वस्थ करतात।।।
मिळत नाही आपणांस हवे
होते ते हवे होते तेव्हा।।।
कर्म आणि अर्थार्जन यांचा
ताळमेळ बसत नाही बरेचदा।।।
आवड आणि निवड यांची सांगड घालण्यात
आख्खं आयुष्य वेचलं तरी कमीच पडतं।।।
पोटाची खळगी भरता भरता आपल्या शक्यतांचा
विस्तार लोप पावतो।।।
अनेक मैलाचे दगड आपल्याला आपल्या प्रवासात
उपलब्ध होतात।।।
अस्थिरतेकडून स्थैर्याकडे वाटचाल करताना विविध
आव्हाने पेलत पोलादाहून कणखर बनावे लागते।।।
असेही कधी होते की निसर्ग आपल्या मार्फत उच्चतम कार्य
लीलया पार पाडते।।।
आपल्या असाधारण क्षमतांचा परिपूर्ण विकास करणे
हे मात्र आपल्याच अखत्यारीत असते।।।
तरी नानाविध अपेक्षांचे बाळगलेले ओझे अलगदपणे
बाजूला ठेवताना हलके नि ताजेतवाने वाटू लागते।।।
जर अतिशय उंची वर उड्डाण करावयाचे तर अनावश्यक
वजन वागवायचे नसते।।।
फूल सहजपणे आत्ममग्न असते आणि
रंग आणि सुगंध यांची आसमंतात उधळण करते।।।
तितक्या सहजतेने आपण स्वेच्छेने सत् गुण जपावेत आणि
कार्य सुगंधाने सर्वांना प्रभावित करावे।।।
ओळखावे आपले ध्येय नि करावा त्याचा विस्तार
सर्वांच्या उन्नयनासाठी।।।
निस्पृहपणे करावी वाटचाल सर्व मानवजातीच्या
कल्याणासाठी।।।
अनंत ऊर्जास्रोत!!!
बरेचदा आपण रेंगाळत राहतो
आपल्या आयुष्यातील
न संपणाऱ्या अपेक्षा आणि
असाध्य ध्येयांभोवती!!!
अचानक आपल्या नजरेसमोर
तरळत राहतात अनपेक्षितपणे
मिळालेले घवघवीत यश
अथवा सपशेल अपयश।।।
मोजक्या दु:ख नि आनंदाच्या क्षणांत
भूतकाळ मोठ्या कातळाप्रमाणे उभा राहतो।।।
भक्कम न हलणारे क्षण आ वासून उभे राहतात।।।
आपण पार नाही करू शकत
भविष्याचा अतर्क्य क्लिष्ट नानास्तरीय घाट।।।
नाही जोखू शकत आव्हाने आणि
संधी यांचा मिलाफ अथवा वियोग।।।
वर्तमानाचा फेकलेला तुकडा
कधी भूतकाळात भिरकावला जातो तेच कळत नाही।।।
क्षणागणिक क्षणे ढासळत राहतात
वृद्ध बुरुजाच्या तटबंदीप्रमाणे।।।
काळा मागे काळाचे चिरे
ठिसूळ होत राहतात।।।
नजरेच्या टप्प्यात सर्वत्र
आठवणींचे धुके विरत जाते।।।
तरीही योग्य क्षणी आपण
जीवनाच्या नानाविध प्रकारच्या
आयामांना गवसणी
घालतोच अचानकपणे।।।
मात्र जेव्हा आपण मनोआकाशाचा
वाढता विस्तार स्वेच्छेने
कवटाळतो तेव्हा निसर्गाच्या
अनंत ऊर्जास्रोताला कवेत घेतो अनाहूतपणे।।।
आपण।।।
कधीकधी आपण आयुष्यात ऐवढे तल्लीन होतो
की आपणास बाह्य बेगडी जगाचा विसर पडतो।।।
आपण आंतरिक आनंदात बुडून जातो।।।
विविध मानसिक ताण स्तब्ध शांततेत विलीन होतात।।।
आयुष्य सुखदुःखाच्या द्वैताला ओलांडून जाते।।।
नीरवतेचा विस्तार सर्वदूर वाढतच जातो।।।
आतबाहेर असा भेद रहात नाही।।।
जे काही दिसते ते आपणच बनतो-सारे काही।।।
आपण बनतो संपूर्ण आकाश नि अवकाशही
अथवा विश्व नि आकाशगंगाही।।।
आपणच बनतो तलाव, नदी,
वृक्ष, पहाड आणि समुद्र सुद्धा।।।
कधी आपणच बनतो पक्षी,
प्राणी नि फुले वा फळे।।।
आणि आपण बनतो -ओतप्रोत प्रेम
आणि अक्षय्य आनंदसुद्धा।।।
आपण कवटाळतो विहंगम सृष्टिला नि नैसर्गिक ताकदींना ।।।
आपण चरणी लीन होतो वैश्विक शक्तींच्या।।
ओंकाराचे अस्तित्व अनुभवतो- बालकांच्या मोहक
बाललीलांत, ऊर्जा-रूपी धगधगत्या तारूण्यात आणि
सात्त्विक करूणाकर वार्धक्याच्या प्रकटीकरणात ।।।
आपण कधी निर्माण करतो अजरामर कलाकृती।।।
आपण निर्मितो सूर, लय नि तालातून आलाप, राग, टप्पा नि
भैरवी।।।
प्रकटवतो आपण कला आणि संस्कृतीचे आविष्कार।।।
आपण लिहितो विज्ञान, शास्त्र, संशोधन, नाट्य नि वाङ्मय।।।
आपण बनतो दुष्ट लंकापतीला संपवणारा मर्यादा पुरुषोत्तम
शूर धिरोदात्त श्रीराम।।।
आपणच धनुर्धारी अर्जुन बनून भेदतो फिरत्या माशाचा
डोळा।।।
आपण फोडतो पोट हिरण्यकश्यपूंचे- नरसिंह बनून।।।
आपण बनतो शिवाजी-डरकाळी फोडत -
"राज्य व्हावे ही श्रींची इच्छा" वा
बनतो मावळा गर्जत-"हरहर महादेव"।।।
आपण उत्पन्न होतो राजघराण्यात बुद्ध बनून,
जगाकडे पाठ फिरवून निघून जातो ज्ञान प्राप्तीतून
जगद्कल्याणासाठी।।।
आपणच बनतो शंकराचार्य धर्माचरण आणि
नीतिरक्षणासाठी।।।
आपणच बनतो गुरू गोविंद सिंह वा महावीर वा जीजस
प्रबोधन नि जनोद्धारासाठी।।।
आपणच बनतो स्वातंत्र्याचे प्रणेते
गांधीजी,लो.टिळक,स्वा.सावरकर,भा.आम्बेडकर, सुभाषचंद्र,
ला. शास्त्री वा वल्लभभाई!!!
आपणच गार्गी, सावित्री नी आनंदी बनून
उद्धार करतो आया बहिणींचा।।।
आपणच बनतो आई जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई
अधर्माचा संहार करण्यासाठी।।।
आपणच बनतो सरोजीनी वा इंदिरा राष्ट्रोद्धारासाठी।।।
आपणच बनतो आई, बहीण, पत्नी, सखी वा मुलगी पुरुषाला
माणूस बनवण्यासाठी।।।
आपणच बनतो - दृश्य नि अदृश्य, सगुण नि निर्गुण,भव्य नि
उदात्त- सर्व काही़- आपल्या मनःपटलावरील प्रतिमांनुसार।।।
एक नवीन सुरूवात!!!
सातत्याने मागोवा घेत जाताना उरतो
लांबलचक भूतकाळाचा तुकडा,
त्याच्या आठवणींचा साक्षेप आणि
त्याचा विराट प्रभाव क्षणोक्षणी
वर्तमानावर आरूढ होणारा।।।
क्षणिक पण ताकदवान काळाचा
अपरंपार महिमा आपण जाणतोच।।।
तो बदलून टाकतो जीवनाची प्रमेये
जी माणूस स्तिमित होऊन बघत बसतो।।
कालौघात अपरिहार्य असतात स्वैर
स्व-निर्मित कृतींची निमित्ते नि परिणाम।।।
काही वेगाने अंगावर धावत येतात निमिषार्धात।।।
तर काही आठवणींच्या कोंदणात
स्थानापन्न होतात कायमचीच।।।
आत्मकेंद्रित घटनांभोवती फिरतांना उसळतात आपल्या
धमन्यांमधील धगधगत वाहणारे रक्तांचे उष्ण पाट ।।।
तसेच अस्थिर करत जातात वेळोवेळी आपणाला
आपल्यातून प्रवाहित होणारे ज्वलंत विचारांचे दाहक स्त्रोत।।।
विसरता येत नाही आपल्यांचे अचानकच
कायमचे दुरावणे नि संपणे।।।
आपल्यांचे शाश्वत भासणारे पण क्षणभंगुर
असणारे अस्तित्व हेलावून टाकते आपल्याला
गडद मृत्यू-छायांमध्ये।।।
तरीही आपणच जोखले पाहिजे याही परिस्थितीत
की आपल्या 'आज' मध्येच क्षमता आहे -
रूजत वाढण्याची, आपणातल्या समूळ परिवर्तनाची,
नानाविध शक्यतांची आणि अनंत विस्ताराची।।।
आपणच शिक्कामोर्तब करावे माणसाच्या माणूसण्यावर-
कृतीशील बनून।।।
अधोरेखित करावे आपले अस्तित्व मुक्ती कडे वाटचाल
करत।।।
वर्तमान क्षणाचा शेवट हीच एक नवीन सुरूवात असू
शकते -अर्थपूर्ण नि सजग होऊन जगण्याची।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
मी जेव्हा नसेल तेव्हा शोधाल तुम्ही मला
सूर्याच्या प्रखर सहस्र रश्मींच्या लख्ख प्रकाशात।।।
पौर्णिमेच्या चंद्राच्या अधीर उत्कट आसमंतात।।
चांदण्यांच्या किणकिणाऱ्या धवल उज्ज्वलतेत।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
नसाल तुम्ही साक्षी माझ्या जीवनध्येयासाठीच्या
धडपडीत मी काय साहिले, पाहिले, अनुभवले।।।
तुम्हाला नसेल कल्पना त्या संपन्नजीवन धारेची,
त्या ओजस्वी आणि उत्तुंग शिखर अथक मार्ग- क्रमणाची।।
माझा प्रवास तुम्ही समजू शकणार नाहीत।।।
नंतर तुम्ही जाणण्याचा फोल प्रयत्नही कराल।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
आयुष्याचा खेळ कुणाला कळला का आहे?
काळ कुणासाठी थांबला आहे का?
प्रत्येकाचा बहर प्रत्येकाचा ऋतू संपणार आहे हे काय
आपणांस ठाऊक नाही?
जीवनाचा सारीपाट क्षणार्धात उधळून
सगळे प्यादे, वजीर, राणी, राजे शह काटशह देत शेवटाला
कवटाळणार आहेतच।।।
असण्याचे नसणे होईल तेव्हा मला
ढवळून जाऊन आठवाल।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
श्वासाचा महिमा संपणार आहे तेव्हा हा कचकडीचा खेळ
संपेल।।।
तुम्ही सैरावैरा धावत नक्षत्रांकडे माझी चौकशी कराल।।।
दाही दिशांमध्ये माझा शोध घ्याल ।।।
माझ्या अस्तित्वाचा सतत उच्चार कराल।।।
पण माझा मागमूस कुठेही सापडणार नाही।।।
तुम्ही तीव्र वेदनेने आक्रंदून निघाल।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
थोडा काळ सरेलही ।।।
काळाच्या ओघात होणारे आघातही ओसरतील।।।
माझ्या नसण्याची तीव्र वेदना तुम्हाला
सुन्न करेल किंवा तुम्हीही कठोर व्हाल।।।
जगरहाटी प्रमाणे नसण्याचं दुःखही धुसर होईल।।।
ओसरेल सुद्धा।।।
कदाचित सगळे सूर्य, चंद्र, चांदण्यांचे फेर धरून नाचणे
थांबेलही क्षणभर।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
मी नसताना तुम्ही तुमच्या असण्याची
शक्यता गृहीत धरली नसेलही।।।
तुमचं असणं माझ्या विना अपूर्ण असेलही।।।
मी आठवणीत उरेल ही अथवा नुरेलही।।।
तुम्हाला नक्की वाटेल खूप बाेलायचं राहून गेलं।।।
निदान विचारपुस तरी केली असती शेवटी
निदान "कसा आहेस?" इतके तरी।।।
पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
माझा हक्क होता तेवढा तरी।।।
न जाणो, तो ही तू हिरावून घेतलास ही
खंत तुला अस्वस्थ करेलही खरं तर।।।
त्यातच मी नसताना तेव्हा
"कसा आहेस?" या तुझ्या छोट्या प्रश्नाच्या
उत्तराची प्रकर्षाने अपेक्षा करशील ।।।
तरी माझ्या कडून काहीही नी काहीच उत्तर येणार नाही।।।
तुला लाखदा वाटेल की मी बोलावे एकदा तरी।।।
-पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल।।।
PC:Facebook, google images
गुरुनमन॥
गुरू देतो जगण्याला दिशा॥
गुरू पल्लवीत करतो जीवन- आशा॥
गुरू प्रदान करतो प्रत्यक्ष ज्ञान॥
गुरू देतो जगण्याचे भान॥
गुरू तोडतो अहंकाराचे पाश॥
गुरू करतो असत्याचा नाश॥
गुरू संहारतो अमानुष हिंसा॥
गुरू अंगिकारतो निस्सीम अहिंसा॥
गुरू असतो अमर्याद आकाश॥
गुरू असतो वैश्विक अवकाश॥
गुरू असतो ऊन्हात सावली॥
गुरू जणू साक्षात माऊली॥
गुरू म्हणजे अनंत ब्रह्मानंद॥
गुरू प्रकटवतो अक्षय्य आत्मानंद॥
गुरू तोडतो अज्ञानाचे मूळ॥
गुरू आहे आनंदघन समूळ॥
गुरू तारतो संसार-सागर॥
गुरू आहे प्रेमाचं आगर॥
गुरू ओलांडतो दु:खाची सीमा॥
गुरू म्हणजे निस्वार्थाची परिसीमा॥
गुरू प्रत्येकाला दावतो उन्नत वाट॥
गुरू म्हणजे अथांग करूणेचा पाट॥
गुरूला करावे प्रथम वंदन॥
साष्टांगाने मी करतो नमन॥
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा प्रत्येकातील गुरूतत्वाला प्रणाम....
आठवणींचा कल्लोळ
आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन, तारूण्य, वार्धक्य अस...
-
आयुष्याचा एकेक टप्पा पार करता करता आठवणींचा कल्लोळ मनात दाटून येवू लागतो।।। बालपण, किशोरावस्था, पौगंडावस्था, यौवन, तारूण्य, वार्धक्य अस...
-
सर्व नियम सहज ओलांडून मी तुझ्यापाशी आलो. स्वतंत्रतेच्या महान तत्वाची ओळख अधरपणे झाली मला. सर्वव्यापी प्रेमानं मला असे काही लपेटलं की मला जाण...
-
करोनाचा धक्का पचवताना अनेक गोष्टींचा मागोवा घेतला गेला।।। गतकाळात अचानकंच डोकावता आलं।।। जीवनाला सकारात्मकतेची जोड देता आली।।। वेळ आणि काळ...